नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून देणारे हे बिन खुर्चीचे संमेलन ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी असे असले तरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन १ तारखेला सकाळी १० वाजता होणार आहे. आपण सारे जण मिळून वाटुळ गावच्या या अक्षरयात्रेत सहभागी होऊन अक्षर दिंडीचे भोई होऊया आणि अभिजात मराठी भाषेला गावखेड्यातून सन्मानित करूया. चला तर मग येताय ना ! आपण तिथेच प्रत्यक्ष भेटूया !
सुभाष लाड
अध्यक्ष
राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई
No comments:
Post a Comment