Search This Blog
उपकार कोणावर करावे ?
उपकार कोणावर करावे ?
🐅🐆 एकदा एक वाघ आणि वाघीण आपल्या पिलांना गुहेत सोडून शिकारीसाठी दूर जंगलात जातात. २ दिवस पर्यंत ते परत आलेच नाही. इकडे पिलांना खूप भूक लागली. कलकल ऐकून एका बकरीला त्यांची दया आली. तिने वाघिणीच्या पिलांना आपले दूध पाजले. पिलांच्या जीवात जीव आला. आता बकरी रोज येऊन त्यांना दूध पाजू लागली. एक दिवस पिले पोट भरल्यानंतर मस्ती करू लागली. तेवढ्यात तिथे वाघ आणि वाघीण परतले. बकरीला पाहून आयती शिकार मिळाल्याच्या आनंदात तिच्यावर वाघ झडप घालणार इतक्यात वाघाची पिले म्हणाली. आई-बाबा या शेळीने आम्हाला दूध पाजून मोठे केलेय. ही नसती तर आम्ही मरून गेलो असतो. हिचे आपल्यावर खूप उपकार आहेत. तुम्ही तिला मारू नका.* 🐅 *पिलांचे ऐकून वाघ खुश झाला आणि तिला म्हणाला. आम्ही तुझे हे उपकार विसरणार नाही. आता तू स्वतंत्रपणे आनंदाने जंगलात एकटी सुद्धा वावरू शकतेस. कुणीही तुला त्रास देणार नाही. याची मी ग्वाही देतो. तेव्हा पासून सदर बकरी मोठ्या धाडसाने जंगलात स्वच्छंदी पणे कुठेही फिरू लागली.
* 🐐 *एकदा तर बकरीला वाघाच्या पाठीवर बसून उंच झाडांची पाने खातांना एका कबुतराने पाहिले आणि कुतूहलाने त्याने बकरीला या किमयेबद्ल विचारले. बकरीने त्याला सर्व हकीकत सांगितली. उपकाराचे महत्व कबुतराच्या लक्षात आले. आपण पण असेच महान कार्य करायचे असे त्या कबुतराने मनातल्या मनात ठरवले.*
🕊 *एकदा कबुतर उडत असतांना त्याला काही उंदराची पिले दलदलीत फसलेली दृष्टीस पडली. ती बाहेर पडायचा प्रयत्न करत असता अधिकच खोल जात होती. शेवटी कबुतराने त्यांना अलगद बाहेर काढले. उंदराची पिले ओली झालेली व थंडीने कुडकुडत होती. कबूतराने त्यांना आपल्या पंखात बऱ्याच वेळ ऊब दिली. थोड्या वेळाने आपल्या घरट्या कडे जाण्यासाठी कबुतराने उंदराच्या पिलांचा निरोप घेतला आणि भरारी घेण्याचा प्रयत्न केला , पण काही केल्या त्याला उडता येईना... तो अस्वस्थ झाला आणि त्याने त्याचे कारण शोधले...!* 🐀 *" उंदराच्या पिल्लांनी ऊब घेता घेता त्या कबुतराचे संपूर्ण पंख कुरतडले होते." फडफडत फडफडत कसाबसे कबुत्तर तेथून बकरी पर्यंत पोहचले आणि त्याने बकरीला विचारले...,* *" तू पण उपकार केलेस आणि मी पण उपकारच केले. पण दोघांना वेगवेगळे फळ कसे मिळाले ?"* 🐐 *बकरी हंसली आणि गंभीरपणे म्हणाली...*
*" उपकार कधीही वाघा सारख्या दिलदार व्यक्तित्वावर करावेत , उंदरा सारख्या स्वार्थीवर नाहीत . कारण असे स्वार्थी लोक नेहमी आपल्या स्वार्था करिता दूसरा पर्याय शोधात असतात... स्वतःचा स्वार्थ साधला कि ते सच्च्या व प्रमाणिक माणसाला पण विसरण्यात स्वतःची धन्यता मानतात . मात्र दिलदार स्वभावाचे निस्वार्थी आणि बहादूर लोक आयुष्यभर उपकार करण्या-याला लक्षात ठेवतात. (Author is unknown)
🐅🐆 एकदा एक वाघ आणि वाघीण आपल्या पिलांना गुहेत सोडून शिकारीसाठी दूर जंगलात जातात. २ दिवस पर्यंत ते परत आलेच नाही. इकडे पिलांना खूप भूक लागली. कलकल ऐकून एका बकरीला त्यांची दया आली. तिने वाघिणीच्या पिलांना आपले दूध पाजले. पिलांच्या जीवात जीव आला. आता बकरी रोज येऊन त्यांना दूध पाजू लागली. एक दिवस पिले पोट भरल्यानंतर मस्ती करू लागली. तेवढ्यात तिथे वाघ आणि वाघीण परतले. बकरीला पाहून आयती शिकार मिळाल्याच्या आनंदात तिच्यावर वाघ झडप घालणार इतक्यात वाघाची पिले म्हणाली. आई-बाबा या शेळीने आम्हाला दूध पाजून मोठे केलेय. ही नसती तर आम्ही मरून गेलो असतो. हिचे आपल्यावर खूप उपकार आहेत. तुम्ही तिला मारू नका.* 🐅 *पिलांचे ऐकून वाघ खुश झाला आणि तिला म्हणाला. आम्ही तुझे हे उपकार विसरणार नाही. आता तू स्वतंत्रपणे आनंदाने जंगलात एकटी सुद्धा वावरू शकतेस. कुणीही तुला त्रास देणार नाही. याची मी ग्वाही देतो. तेव्हा पासून सदर बकरी मोठ्या धाडसाने जंगलात स्वच्छंदी पणे कुठेही फिरू लागली.
* 🐐 *एकदा तर बकरीला वाघाच्या पाठीवर बसून उंच झाडांची पाने खातांना एका कबुतराने पाहिले आणि कुतूहलाने त्याने बकरीला या किमयेबद्ल विचारले. बकरीने त्याला सर्व हकीकत सांगितली. उपकाराचे महत्व कबुतराच्या लक्षात आले. आपण पण असेच महान कार्य करायचे असे त्या कबुतराने मनातल्या मनात ठरवले.*
🕊 *एकदा कबुतर उडत असतांना त्याला काही उंदराची पिले दलदलीत फसलेली दृष्टीस पडली. ती बाहेर पडायचा प्रयत्न करत असता अधिकच खोल जात होती. शेवटी कबुतराने त्यांना अलगद बाहेर काढले. उंदराची पिले ओली झालेली व थंडीने कुडकुडत होती. कबूतराने त्यांना आपल्या पंखात बऱ्याच वेळ ऊब दिली. थोड्या वेळाने आपल्या घरट्या कडे जाण्यासाठी कबुतराने उंदराच्या पिलांचा निरोप घेतला आणि भरारी घेण्याचा प्रयत्न केला , पण काही केल्या त्याला उडता येईना... तो अस्वस्थ झाला आणि त्याने त्याचे कारण शोधले...!* 🐀 *" उंदराच्या पिल्लांनी ऊब घेता घेता त्या कबुतराचे संपूर्ण पंख कुरतडले होते." फडफडत फडफडत कसाबसे कबुत्तर तेथून बकरी पर्यंत पोहचले आणि त्याने बकरीला विचारले...,* *" तू पण उपकार केलेस आणि मी पण उपकारच केले. पण दोघांना वेगवेगळे फळ कसे मिळाले ?"* 🐐 *बकरी हंसली आणि गंभीरपणे म्हणाली...*
*" उपकार कधीही वाघा सारख्या दिलदार व्यक्तित्वावर करावेत , उंदरा सारख्या स्वार्थीवर नाहीत . कारण असे स्वार्थी लोक नेहमी आपल्या स्वार्था करिता दूसरा पर्याय शोधात असतात... स्वतःचा स्वार्थ साधला कि ते सच्च्या व प्रमाणिक माणसाला पण विसरण्यात स्वतःची धन्यता मानतात . मात्र दिलदार स्वभावाचे निस्वार्थी आणि बहादूर लोक आयुष्यभर उपकार करण्या-याला लक्षात ठेवतात. (Author is unknown)
वन मिनिट प्रिंसिपल
वन मिनिट प्रिंसिपल
दहा दिवस हा प्रयोग सगळयांनी मिळून करायचा आहे. एखादी चांगली सवय जी आपल्याला असायला हवी असं मनापासून वाटतंय पण जमतच नाही, कळतंय पण वळत नाही असं वाटतंय. अशी एकच एक सवय, चांगली गोष्ट निवडा. या सवयीचा अक्षरशः लहानसा भाग ठरवा. लहान किती तर अक्षरशः काहीतरीच काय, फक्त ईतकंच असं वाटेल, बालिशपणा वाटेल इतका लहान भाग.
1.रोज एका पुस्तकाचं एकच पान.
2.रोज एकच सुर्यनमस्कार.
3.रोज एक योगासन.
4.रोज पाच मिनिट मेडिटेशन.
5.रोज दोन स्पेलिंग पाठ करणे.
6.रोज चांगल्या अक्षरात दोन ओळी लिहिणे.
असच.. कितीही ... काहीही..
या अक्षरशः एका मिनिटाच्या व्रताने पुढे काय बदल होऊ शकेल हे प्रत्यक्ष अनुभवानेच समजून घ्या.
कोण कोण एक मिनिटाच्या सवयीत भाग घेतंय? त्यांनी कमेंट जरुर करा. रोज दिवसभरात कधीही एकदा तो एक मिनिट ते ठरवलेलं काम करायचंय.
21 दिवसात साधारण सवय लागते... त्यामुळे संकल्प 21 दिवसांचाच करा.
*काय आहे वन मिनिट प्रिसिंपल?*
*Kaizen*
जपान मध्ये kaizenचा शोध लागला आणि मानवी आयुष्याला जबरदस्त कलाटणी मिळाली. Kai म्हणजे बदल आणि झेन म्हणजे शहाणपणा.
(Change +Wisdom).
आयुष्याला आकार देणा-या या जादूच्या तंत्राचा उपयोगकरून आपण आपले जगणे आणखी सोपे आणि सहज करू शकतो. वेळेच्या नियोजनात आजवर शिकलेल्या सर्व युक्त्यांपेक्षा अतिशय सोपी युक्ती म्हणजे, *‘वन मिनिट प्रिन्सिपल’*
*Masaaki Imai* यांनी 'वन मिनिट प्रिन्सिपल’ चा शोध लावला आणि आज जपान या तंत्राचा अवलंब करत यशाची शिखरेगाठणारा देश ठरलेला आहे. आपण वेळेच्या नियोजनात अपयशी ठरतो त्याचे कारण सातत्य ठेवण्यात कमी पडतो. त्यामुळे अपराधी भाव येतो तो वाढत वाढत आत्मग्लानीचं रूप घेतो, आपण काही करू शकत नाही आपल्यात जिद्द नाही, आपण एखादे काम करण्यास लायक नाही अशी नकारात्मकता आपल्याला ग्रासून टाकते. अशा वेळी एखाद्या जादूसारखी ती टेक्निक काम करते. मला एका मिनिटात वेळेचे नियोजन शिकवा म्हटले तर मी हा नियम शिकवेन. काय आहे सूत्र? तर सवयी किंवा आयुष्यातला बदल हा अचानक होत नसून तो सावकाश पण नियोजनपूर्वक शहाणपणाने करायला हवा, सातत्य आणि सराव यासाठी नियमित योजना असते. आत्मविश्वास देणारा हा नियम म्हणजे 60 सेकंद दररोज एखाद्या ध्येयासाठी वापरा. आपल्याला हसू येईल, विश्वास बसणार नाही पण दररोज एक मिनिट हा चमत्कारासारखे रिझल्ट देतो. काय आहे नियम तर...
Every day
At the same time
Just for a minute
दररोज ठराविक वेळी फक्त एक मिनिट कोणतेही ध्येयाशी संबंधित एखादे काम पूर्ण करायचे असेल तर व्रत घेतल्यासारखे ते करायचे हे यशाचे सूत्र आपण जाणतो. पण त्यासाठी एकदम दोन तास, एक तास अशा तासांच्या भाषेत हट्टीपणा करतो आणि मन बंड पुकारते कधीकधी परिस्थितीची साथ नसते. अशा वेळी एक मिनिट फक्त एक मिनिट करायचे आहे हे ठरवताच हसत हसत आपण तयार होतो. मनाची साथ मिळते आणि तेवढा वेळ सहज काढू शकू असा आत्मविश्वास तयार होतो. आता कामाला कृतीला सुरुवात करायची. एक मिनिट काम करायचे आणि अक्षरश: बाजूला ठेवून द्यायचे. दुस-या दिवशी परत तेच. गंजलेल्या चाकाला रोज एकदा फिरवायचे, बंद पडलेल्या गाडीला रोज एकदा फक्त सुरु करायची, रोज एक पान वाचायचे, रोज पाच ओळी लिहायच्या, रोज एक श्लोक वाचायचा, रोज एक काहीही छोटेसे..
जमेल? सोप्पय हो नक्कीच!
एकदा मोमेंटम गती मिळाली की ते काम झपाट्याने पूर्ण होईल. हा प्रयोग करून तर पहा. अनुभव घ्या, मग भरपूर पसरवा. मी तेच करतेय, वेळेच्या नियोजनावर रोज थोडसं वाचायचं आणि थोडंसं लिहायचं...हाच नियम...!
(Author is unknown)
दहा दिवस हा प्रयोग सगळयांनी मिळून करायचा आहे. एखादी चांगली सवय जी आपल्याला असायला हवी असं मनापासून वाटतंय पण जमतच नाही, कळतंय पण वळत नाही असं वाटतंय. अशी एकच एक सवय, चांगली गोष्ट निवडा. या सवयीचा अक्षरशः लहानसा भाग ठरवा. लहान किती तर अक्षरशः काहीतरीच काय, फक्त ईतकंच असं वाटेल, बालिशपणा वाटेल इतका लहान भाग.
1.रोज एका पुस्तकाचं एकच पान.
2.रोज एकच सुर्यनमस्कार.
3.रोज एक योगासन.
4.रोज पाच मिनिट मेडिटेशन.
5.रोज दोन स्पेलिंग पाठ करणे.
6.रोज चांगल्या अक्षरात दोन ओळी लिहिणे.
असच.. कितीही ... काहीही..
या अक्षरशः एका मिनिटाच्या व्रताने पुढे काय बदल होऊ शकेल हे प्रत्यक्ष अनुभवानेच समजून घ्या.
कोण कोण एक मिनिटाच्या सवयीत भाग घेतंय? त्यांनी कमेंट जरुर करा. रोज दिवसभरात कधीही एकदा तो एक मिनिट ते ठरवलेलं काम करायचंय.
21 दिवसात साधारण सवय लागते... त्यामुळे संकल्प 21 दिवसांचाच करा.
*काय आहे वन मिनिट प्रिसिंपल?*
*Kaizen*
जपान मध्ये kaizenचा शोध लागला आणि मानवी आयुष्याला जबरदस्त कलाटणी मिळाली. Kai म्हणजे बदल आणि झेन म्हणजे शहाणपणा.
(Change +Wisdom).
आयुष्याला आकार देणा-या या जादूच्या तंत्राचा उपयोगकरून आपण आपले जगणे आणखी सोपे आणि सहज करू शकतो. वेळेच्या नियोजनात आजवर शिकलेल्या सर्व युक्त्यांपेक्षा अतिशय सोपी युक्ती म्हणजे, *‘वन मिनिट प्रिन्सिपल’*
*Masaaki Imai* यांनी 'वन मिनिट प्रिन्सिपल’ चा शोध लावला आणि आज जपान या तंत्राचा अवलंब करत यशाची शिखरेगाठणारा देश ठरलेला आहे. आपण वेळेच्या नियोजनात अपयशी ठरतो त्याचे कारण सातत्य ठेवण्यात कमी पडतो. त्यामुळे अपराधी भाव येतो तो वाढत वाढत आत्मग्लानीचं रूप घेतो, आपण काही करू शकत नाही आपल्यात जिद्द नाही, आपण एखादे काम करण्यास लायक नाही अशी नकारात्मकता आपल्याला ग्रासून टाकते. अशा वेळी एखाद्या जादूसारखी ती टेक्निक काम करते. मला एका मिनिटात वेळेचे नियोजन शिकवा म्हटले तर मी हा नियम शिकवेन. काय आहे सूत्र? तर सवयी किंवा आयुष्यातला बदल हा अचानक होत नसून तो सावकाश पण नियोजनपूर्वक शहाणपणाने करायला हवा, सातत्य आणि सराव यासाठी नियमित योजना असते. आत्मविश्वास देणारा हा नियम म्हणजे 60 सेकंद दररोज एखाद्या ध्येयासाठी वापरा. आपल्याला हसू येईल, विश्वास बसणार नाही पण दररोज एक मिनिट हा चमत्कारासारखे रिझल्ट देतो. काय आहे नियम तर...
Every day
At the same time
Just for a minute
दररोज ठराविक वेळी फक्त एक मिनिट कोणतेही ध्येयाशी संबंधित एखादे काम पूर्ण करायचे असेल तर व्रत घेतल्यासारखे ते करायचे हे यशाचे सूत्र आपण जाणतो. पण त्यासाठी एकदम दोन तास, एक तास अशा तासांच्या भाषेत हट्टीपणा करतो आणि मन बंड पुकारते कधीकधी परिस्थितीची साथ नसते. अशा वेळी एक मिनिट फक्त एक मिनिट करायचे आहे हे ठरवताच हसत हसत आपण तयार होतो. मनाची साथ मिळते आणि तेवढा वेळ सहज काढू शकू असा आत्मविश्वास तयार होतो. आता कामाला कृतीला सुरुवात करायची. एक मिनिट काम करायचे आणि अक्षरश: बाजूला ठेवून द्यायचे. दुस-या दिवशी परत तेच. गंजलेल्या चाकाला रोज एकदा फिरवायचे, बंद पडलेल्या गाडीला रोज एकदा फक्त सुरु करायची, रोज एक पान वाचायचे, रोज पाच ओळी लिहायच्या, रोज एक श्लोक वाचायचा, रोज एक काहीही छोटेसे..
जमेल? सोप्पय हो नक्कीच!
एकदा मोमेंटम गती मिळाली की ते काम झपाट्याने पूर्ण होईल. हा प्रयोग करून तर पहा. अनुभव घ्या, मग भरपूर पसरवा. मी तेच करतेय, वेळेच्या नियोजनावर रोज थोडसं वाचायचं आणि थोडंसं लिहायचं...हाच नियम...!
(Author is unknown)
समस्या विनाकारण....
एका राजा ने अतिशय सुंदर ''महाल'' बनवला
आणि महालाच्या मुख्य द्वारावर एक ''गणिताचे सूत्र'' लिहीले
आणि घोषणा केली की
या सूत्रानुसार हा महाद्वार जो कोणी उघडेल त्याला
मी माझा उत्तराधीकारी घोषित करेन !
कारण राजा निपुत्रीक होता व त्याला राज्य अशा
व्यक्तीकडे द्यायचे होते कि ती व्यक्ती अतिशय चाणाक्ष असावी ! घोषणा ऐकून
राज्यातले मोठे मोठे गणितज्ञ आले आणि सूत्र पाहुन निघून गेले कारण असं सुत्र त्यांनी आयुष्यात पाहिल नव्हतं ?
मुदतीचा शेवटचा दिवस आला त्या दिवशी ३ लोक आले आणि म्हणाले आम्ही हे सूत्र सोडवायचा प्रयत्न करू
त्यामधील २ जण दुसऱ्या राज्यातील मोठे गणितज्ञ होते
आणि एक त्याच राज्यातील अतिशय गरीब पण हुशार असा शेतकरी होता.
गणितज्ञानी वेगवेगळी सुत्रे वापरून पाहिली
पण दरवाजा उघडु शकले नाही ?
सर्व लोक हैराण झाले कि जिथे एवढे मोठे गणितज्ञ हरले
तिथे हा शेतकरी काय करील बिचारा साधासुधा माणुस? शेवटी त्याला सांगण्यात आल की चला तुमची वेळ आली आहे ! शेतकऱ्याने सहज स्मित केलं दरवाजाकडे गेला
सूत्र वाचलं पण त्याला काय कळणार ??
शेवटी त्याने चाणाक्षपणे दरवाजा न्याहळुन त्याला मागे ढकलले !! आणि काय आश्चर्य दरवाजा सहज उघडला ? सर्व हैराण झाले आणि त्याच्या नावाचा जयजयकार केला !!
नंतर त्याचा सन्मान करुन राजाने सहज विचारलं की
आपण काय सूत्र वापरून दरवाजा उघडला ??
तो शेतकरी नम्रपणे म्हणाला
की मी विचार केला कि गेले सहा दिवस एवढे मोठे विद्वान सुत्रं वापरतात पण दरवाजा उघडत नाही
मग सुत्रच खोटे असावे आणि दरवाजा पाहिला तर
त्याला कडीकुलुप पण दिसत नाही ? मी ठरवलच होतं की
समस्या काय हे पहिले बघू नंतर ती कशी सोडवायची ते ठरवु आणि मी तेच केल.
कित्येकवेळा जीवनात ''समस्या'' ही नसतेच पण आम्ही त्या विचारांनीच अर्धमेले होतो की ती कशी सुटेल आणि चिंता करताना ती समस्या विनाकारण अतिशय जटील बनते.
जीवन दुःखी होण्याच हेच मोठं कारण आहे की आम्ही नको तिकडे जास्त लक्ष देतो !
(लेखक माहीत नाहीत.)
आणि महालाच्या मुख्य द्वारावर एक ''गणिताचे सूत्र'' लिहीले
आणि घोषणा केली की
या सूत्रानुसार हा महाद्वार जो कोणी उघडेल त्याला
मी माझा उत्तराधीकारी घोषित करेन !
कारण राजा निपुत्रीक होता व त्याला राज्य अशा
व्यक्तीकडे द्यायचे होते कि ती व्यक्ती अतिशय चाणाक्ष असावी ! घोषणा ऐकून
राज्यातले मोठे मोठे गणितज्ञ आले आणि सूत्र पाहुन निघून गेले कारण असं सुत्र त्यांनी आयुष्यात पाहिल नव्हतं ?
मुदतीचा शेवटचा दिवस आला त्या दिवशी ३ लोक आले आणि म्हणाले आम्ही हे सूत्र सोडवायचा प्रयत्न करू
त्यामधील २ जण दुसऱ्या राज्यातील मोठे गणितज्ञ होते
आणि एक त्याच राज्यातील अतिशय गरीब पण हुशार असा शेतकरी होता.
गणितज्ञानी वेगवेगळी सुत्रे वापरून पाहिली
पण दरवाजा उघडु शकले नाही ?
सर्व लोक हैराण झाले कि जिथे एवढे मोठे गणितज्ञ हरले
तिथे हा शेतकरी काय करील बिचारा साधासुधा माणुस? शेवटी त्याला सांगण्यात आल की चला तुमची वेळ आली आहे ! शेतकऱ्याने सहज स्मित केलं दरवाजाकडे गेला
सूत्र वाचलं पण त्याला काय कळणार ??
शेवटी त्याने चाणाक्षपणे दरवाजा न्याहळुन त्याला मागे ढकलले !! आणि काय आश्चर्य दरवाजा सहज उघडला ? सर्व हैराण झाले आणि त्याच्या नावाचा जयजयकार केला !!
नंतर त्याचा सन्मान करुन राजाने सहज विचारलं की
आपण काय सूत्र वापरून दरवाजा उघडला ??
तो शेतकरी नम्रपणे म्हणाला
की मी विचार केला कि गेले सहा दिवस एवढे मोठे विद्वान सुत्रं वापरतात पण दरवाजा उघडत नाही
मग सुत्रच खोटे असावे आणि दरवाजा पाहिला तर
त्याला कडीकुलुप पण दिसत नाही ? मी ठरवलच होतं की
समस्या काय हे पहिले बघू नंतर ती कशी सोडवायची ते ठरवु आणि मी तेच केल.
कित्येकवेळा जीवनात ''समस्या'' ही नसतेच पण आम्ही त्या विचारांनीच अर्धमेले होतो की ती कशी सुटेल आणि चिंता करताना ती समस्या विनाकारण अतिशय जटील बनते.
जीवन दुःखी होण्याच हेच मोठं कारण आहे की आम्ही नको तिकडे जास्त लक्ष देतो !
(लेखक माहीत नाहीत.)
नूतन वर्षाच्या शुभेच्छा...
रांगोळी... व्यक्त होण्याचं माध्यम म्हणून अनेक जण या कलेचा वापर करतात तर काहीजण सौंदर्य निर्मितीसाठी केवळ इतरांच्या कलेचे इमिटेशन करतात. काही असलं तरी या ना त्या प्रकारे कलेची जपणूक केली जाते. विशेषतः सण- समारंभात रंगोळीला महत्त्व येत. गुढीपाडव्याच्या निमित्ताने आज सौ (श्रावणी)ने काढलेल्या रांगोळीने अंगणाची शोभा तर वाढलीच त्याच सोबत सणामध्ये चैतन्य निर्माण झालं ते वेगळंच...@prakashharchekar
Subscribe to:
Posts (Atom)