Happiness depends upon ourselves.–Aristotle. Life begins where fear ends.

आजी आजोबा...

मला संतोष पवार भेटला तेव्हा मी त्याला विचारले "आता तुझ्यासोबत हे कोण पाहुणे आहेत ?" तो म्हणाला," हे माझे आईवडील आहेत. "
 मला खुप आश्चर्य वाटले. मी त्याला लगेच म्हणालो," मागच्या वेळी तर वेगळे होते. हे तर दुसरेच कोणीतरी आहेत. हे कसं काय ?"
 तर तो मला म्हणाला," आपण हाॅटेलमध्ये बसून बोलुयात. "
 आम्ही जवळच असलेल्या चहाच्या टपरीवर गेलो. तेथे बाकावर बसलो. तो मला सांगू लागला.
 " माझे आई वडील लहानपणीच वारले. माझ्या काकाकाकूंनीच मला वाढवले. नोकरी लगेच मिळाली आणि छोकरीही. कारण माझे वर्गातील एका मुलीवर प्रेम होते. मला नोकरी लागताच मी माझ्या काकांना या प्रेमाबद्दल सांगितले. त्यांनी होकार तर दिलाच शिवाय ते माझ्यासोबत मागणी घालायला तिच्या घरीसुध्दा आले. लग्न नोंदणी पध्दतीने झाले आणि माझी बदली नागपूराहून थेट मुंबई ला झाली. आमच्या  कंपनी ने मला रहायला विरारला बैठे घर दिले. तेथे सर्व सुखसोयी होत्या पण मी नोकरीला जाताच घरी बायको कंटाळुन जायची.
 मला ती नेहमी म्हणायची "सासूसासरे असते तर बरे झाले असते. त्यांची घरात थोडी मदतही झाली असती आणि मुलांना छान संस्कार मिळाले असते."
                    एकदा आम्ही बागेत सगळे फिरायला गेलो होतो. तेथे एक आजी आजोबा उदास बसलेले दिसले. मी विचारले, " काय काका, काही त्रास होतो आहे का ? मी काही मदत करु शकतो का ?"
 तर ते म्हणाले," बाळा, आम्हा दोघांना एकटेपणा खातो आहे रे. आयुष्य गेलं स्वप्ने रंगवण्यात. आता काम होत नाही. लगेच थकवा येतो. पण काम करण्याशिवाय पर्यायही नाही. "
 मी म्हणालो," मुले सांभाळत नाहीत ?"
 त्यावर ते म्हणाले, " मुलगा सून अमेरिकेतच असतात. "
 आणि दोघांनी त्यांची तोंडे बाजूला वळवली आणि डोळ्यांना रुमाल लावला.
 मी काय समजायचे ते समजलो. आणि म्हणालो," आमच्याकडे येता का आठ दिवस रहायला ? तेवढाच हवाबदलही होईल आणि या दोन नातवंडात वेळही जाईल. "
 तर ते म्हणाले," बाळा तुला कशाला आमचा त्रास ? अरे नेहमी इथेच भेटु आपण सगळे रविवारचे. "
 आणि मग दर रविवारी आमची त्यांची भेट होऊ लागली.

Gramin Sahitya Sammelan

ग्रामीण साहित्य संमेलन...