Happiness depends upon ourselves.–Aristotle. Life begins where fear ends.

शिस्त आणि विद्यार्थी


*शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा शिस्त आणि विद्यार्थी यावरील लेख.*

विद्यार्थ्यांना घडवण्यात शिक्षकांची मोठी भूमिका असते. काळानुसार या भूमिका बदलत जातात. भूमिका जशा शिक्षकांच्या बदलत जातात तशा पालकांच्या सुद्धा. *बर्याच वेळा शिक्षक पालक यांच्या नात्यांवर विद्यार्थ्यांची प्रगती अवलंबून असते.*
५० वर्षांपूर्वी गुरुजी विद्यार्थ्यांवर मेहनत घ्यायचे. विद्यार्थ्यांना झोडपले मारले तरी पालक शिक्षकांना काही बोलायचे नाही, उलट विद्यार्थी आई - वडिलांना सांगायचे नाही की आज शाळेत मला शिक्षा झाली किंवा मला मारले कारण वडिलांचा अजून मार बसायचा. तुला शिक्षा झाली म्हणजे तू चुकलाच असेल ही धारणा पक्की होती. याचा परिणाम असा झाला होता की शिक्षकांबद्दल भीतीयुक्त आदर होता. *शिक्षक हेच सुधारण्याचे प्रवेशद्वार यावर पालकांची श्रद्धा होती*. त्या काळात शिक्षक ही तसेच होते म्हणा. . अशा शिक्षकांमुळे आपण सारे घडलो, आयुष्यात येणाऱ्या समस्या या आपल्यालाच स्वतःला सोडवायच्या असतात. . आपले आई-वडील शाळेत येऊन शिक्षकांशी बोलणार नाही, समस्या सोडवणार नाही. . यामुळे नियमबाह्य कामच करू नका. .चुकीचे गैरवर्तन करू नका. . हे शिक्षकांच्या धाकामुळे शक्य झाले जे पुढे आयुष्यात नोकरी-व्यवसाय करताना खूप उपयोगी पडले.
शाळेतील नियम पाळल्यामुळे ऑफिसमध्ये वेळेवर जाण्याची सवय लागली.

आजकालचे पालक विद्यार्थ्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीं मधे नाक खुपसून शिक्षकांशी चर्चा (वाद) करायला येतात आणि ही चर्चा चालते त्या मुलानं देखत. जिथे मुलांच्या मनाला समजते की आई-वडील हे आपल्या प्रत्येक समस्या सोडतील (समस्या या समस्या नसून बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचे गैरवर्तन असते पण ते त्याला कधीच मान्य नसते.) आई-वडील आपल्या वर्तुणुकीला सपोर्ट करतात हे बघून त्यांचे सुधारण्याचे मार्ग हळूहळू कमी होत जातात. हे त्या मुलाला समजत नसते किंबहुना हे समजण्याचे वयच नसते पण पालकांना समजत असते पण आंधळ्या प्रेमापोटी ते समजण्याची मनस्थिती नसते.

50 वर्षांपूर्वीचे शिक्षक हे खरे गुरुजी होते. त्यानंतर गुरुजी हळूहळू कमी होत त्यांच्यातले उरलें कडक शिक्षक. .
या कडक शिक्षकांमुळे

आयटीआयमधील बदल


ITI च्या अभ्यासक्रमांचा प्रस्ताव


‘आयटीआय’च्या नव्या अभ्यासक्रमांचा प्रस्ताव पुढे सरकेच ना!Published On: Jul 07 2018 10:42PM | Last Updated: Jul 07 2018 10:42PM

आसगे : प्रकाश हर्चेकर

विद्यार्थ्यांना कौशल्याधारित अभ्यासक्रम निवडून स्वयंरोजगार करता यावा, यासाठी शासनातर्फे तालुकास्तरावर औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना परवानगी देऊन सुसज्ज इमारती उभारण्यात आल्या. त्याद्वारे मूलभूत सोयीसुविधा देण्यात आल्या. परंतु, काही ठिकाणी साधनसामुग्री व यंत्रसामुग्री यांची पूर्तता करण्यात आली नाही. सुरुवातीला सुरु असलेले ट्रेडच पुढे चालू ठेवण्यात आले. ट्रेडचा फेरआढावा घेऊन व सर्वेक्षण करून स्थानिकांची गरज व मागणीनुसार नव्याने अभ्यासक्रम गेल्या अनेक वर्षांत अद्याप सुरु करण्यात आलेले नाहीत.

सध्या औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. राज्यभरात शासकीय व खासगी दोन्ही मिळून सुमारे 1 लाख 36 हजार 193 जागा उपलब्ध आहेत.
या अभ्यासक्रमांना  आवश्यकतेपेक्षा अधिक हजारो विद्यार्थी प्रवेश घेण्यास उत्सुक दिसतात. तालुकास्तरावर कौशल्याधिष्टीत अभ्यासक्रमांना पसंती मिळत असताना दहा ते पंधरा वर्षांपासून सुरु असलेल्या ट्रेडमध्ये वाढ करण्यात येत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. अधिकचे पर्याय उपलब्ध नसल्याने आहेत तेच पर्याय ना इलाजास्तव स्वीकारावे लागत आहेत.

इमारतींवर कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेले इन्फ्रास्ट्रक्चर नवीन ट्रेड चालू केले नसल्याने कुचकामी ठरत आहे. शासनाने एका बाजूला विद्यार्थ्यांना उच्च अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी परवानगी देऊन औद्योगिक शिक्षणाकडे ओढा वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसर्‍या बाजूला सुयोग्य प्रसिद्धी व नव नवीन ट्रेड सुरु करण्यात उदासीनता दाखवत समाजात संभ्रमावस्था निर्माण केली आहे

हार...

" मी जगदीश महाजन.मी रिटायर्ड क्लास वन आँफिसर आहे.ही आमची पहिलीच फाँरेन टूर आहे" बँकाँकच्या हाँटेलमध्ये मी सगळ्या ग्रुपला माझी ओळख करुन दिली.
"साहेबांनी त्यांची अपूरी ओळख आपल्याला करुन दिलीये."आमचा ग्रुप लिडर सर्वांना सांगू लागला."तुम्हाला कल्पना नसेल पण साहेबांचे आपल्या मुख्यमंत्र्यांशी खुप जवळचे संबंध आहेत.आमदार,खासदारांसोबत तर त्यांची रोजची बैठक असते"
सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.मी मनातून खुष झालो पण मी तसं चेहऱ्यावर दाखवलं नाहीं.हळूहळू सगळे आपला परीचय करुन देऊ लागले.बऱ्याच जणांची ही पहिलीच विदेशवारी होती तर काही जणांची दुसरी किंवा तिसरी.सर्वात शेवटी एक साधारण कपडे घातलेला एक माणूस उभा राहिला.त्यांच्या कपड्यांमुळे म्हणा किंवा सगळ्यांना जेवणाचे वेध लागले होते त्यामुळे म्हणा कुणी त्याला गांभीर्याने घेण्याच्या मुडमध्ये नव्हतं.
"मी सदानंद पाठक आणि ही माझी पत्नी मीनाक्षी पाठक.मी एका शैक्षणिक संस्थेत क्लार्क म्हणून काम करतो.आमची ही नववी फाँरेन टूर आहे" त्या हाँलमध्ये एकदम शांतता पसरली.मला तर आश्चर्याचा धक्काच बसला.
"आतापर्यंत आम्ही भुतान,श्रीलंका,सिंगापूर,मलेशिया,व्हिएतनाम, इंडोनेशिया, हाँगकाँग, जपान या देशात जाऊन आलोय.पुढील वर्षी युरोप टूरला जायचा विचार करतोय"
अजूनही लोक धक्क्यातून बाहेर आले नव्हते.एका मामुली कारकुंड्याने इतक्या फाँरेन टुर्स कराव्या हे कुणाच्या पचनी पडत नव्हतं.
"पाठक तुम्ही एकटे गेले होतात की सहकुटूंब?"मी विचारलं
" सहपत्नीक!तसं मुलांनाही तीनचार देशात घेऊन गेलो होतो पण त्यांच्या शिक्षण आणि करीयरमुळे सगळ्या देशात नेता आलं नाही"
" पाठक शैक्षणिक संस्थेत चांगला हात मारलेला दिसतोय तुम्ही" मी म्हंटलो तसा एकच हशा पिकला.पण पाठक गंभीर होता.
" अहो साहेब जवळजवळ सगळ्या शैक्षणिक संस्था राजकारण्यांच्या हातात असतांना एक मामुली कारकून काय हात मारणार आहे?"
सगळे शांत झाले.
"आम्हांला दोघांनाही प्रवास आणि पर्यटनाची आवड"पाठक पुढे बोलू लागला "जगप्रवास हे आमचं ध्येय होतं.पण कमाई तर तेवढी नव्हती.बचत हा एकमेव मार्ग होता तो आम्ही अवलंबला....."
तेवढ्यात जेवण तयार झाल्याची बातमी घेऊन एक माणूस आला.सगळे उठले.पण मी पाठकला सोडणार नव्हत़ो.मी त्याला म्हंणालो.
पाठक तुमच्याशी सविस्तर बोलायचं होतं"

आजी आजोबा...

मला संतोष पवार भेटला तेव्हा मी त्याला विचारले "आता तुझ्यासोबत हे कोण पाहुणे आहेत ?" तो म्हणाला," हे माझे आईवडील आहेत. "
 मला खुप आश्चर्य वाटले. मी त्याला लगेच म्हणालो," मागच्या वेळी तर वेगळे होते. हे तर दुसरेच कोणीतरी आहेत. हे कसं काय ?"
 तर तो मला म्हणाला," आपण हाॅटेलमध्ये बसून बोलुयात. "
 आम्ही जवळच असलेल्या चहाच्या टपरीवर गेलो. तेथे बाकावर बसलो. तो मला सांगू लागला.
 " माझे आई वडील लहानपणीच वारले. माझ्या काकाकाकूंनीच मला वाढवले. नोकरी लगेच मिळाली आणि छोकरीही. कारण माझे वर्गातील एका मुलीवर प्रेम होते. मला नोकरी लागताच मी माझ्या काकांना या प्रेमाबद्दल सांगितले. त्यांनी होकार तर दिलाच शिवाय ते माझ्यासोबत मागणी घालायला तिच्या घरीसुध्दा आले. लग्न नोंदणी पध्दतीने झाले आणि माझी बदली नागपूराहून थेट मुंबई ला झाली. आमच्या  कंपनी ने मला रहायला विरारला बैठे घर दिले. तेथे सर्व सुखसोयी होत्या पण मी नोकरीला जाताच घरी बायको कंटाळुन जायची.
 मला ती नेहमी म्हणायची "सासूसासरे असते तर बरे झाले असते. त्यांची घरात थोडी मदतही झाली असती आणि मुलांना छान संस्कार मिळाले असते."
                    एकदा आम्ही बागेत सगळे फिरायला गेलो होतो. तेथे एक आजी आजोबा उदास बसलेले दिसले. मी विचारले, " काय काका, काही त्रास होतो आहे का ? मी काही मदत करु शकतो का ?"
 तर ते म्हणाले," बाळा, आम्हा दोघांना एकटेपणा खातो आहे रे. आयुष्य गेलं स्वप्ने रंगवण्यात. आता काम होत नाही. लगेच थकवा येतो. पण काम करण्याशिवाय पर्यायही नाही. "
 मी म्हणालो," मुले सांभाळत नाहीत ?"
 त्यावर ते म्हणाले, " मुलगा सून अमेरिकेतच असतात. "
 आणि दोघांनी त्यांची तोंडे बाजूला वळवली आणि डोळ्यांना रुमाल लावला.
 मी काय समजायचे ते समजलो. आणि म्हणालो," आमच्याकडे येता का आठ दिवस रहायला ? तेवढाच हवाबदलही होईल आणि या दोन नातवंडात वेळही जाईल. "
 तर ते म्हणाले," बाळा तुला कशाला आमचा त्रास ? अरे नेहमी इथेच भेटु आपण सगळे रविवारचे. "
 आणि मग दर रविवारी आमची त्यांची भेट होऊ लागली.

Gramin Sahitya Sammelan

ग्रामीण साहित्य संमेलन...

Shimgotsav...


आसगेत रंगला पालखी भेट सोहळा....
लांजा तालुक्यातील आसगे येथे ग्रामदैवत श्री रवळनाथ इटलाईदेवीच्या शिमगोत्सवाला दिमाखात सुरुवात झाली. होळीच्या दिवशी हा उत्सव सुरु होतो व ग्रामदेवतेची पालखी वेगवेगळ्या वाड्यावरील भक्तांच्या भेटीला जाते व त्यानंतर उत्सवाची सांगता होते. या दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात. 
         परंपरेनुसार हा उत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो. आडवली येथील  ग्रामदैवत गांगेश्वर व आसगे येथील श्री इटलाईदेवी यांच्यामध्ये भाऊ बहिणीचे नाते मानले जाते. दरवर्षी या भावंडांची भेट होते. यावर्षी शनिवार दि. ३ मार्च रोजी आडवली येथून श्री गांगेश्वर देवतेची पालखी ढोल ताशांच्या गजरात आसगे येथे सकाळी दाखल झाली. भक्तिमय वातावरणात देवतांची यथासांग पूजा करण्यात आली. या उत्सवाला यात्रेचे स्वरूप आले होते. दुपारी पाहुणचार झाल्यानंतर दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी पालख्या नाचविण्याचा मनमुराद आनंद घेतला. अखेर सायंकाळी ५.३० नंतर श्री गांगेश्वर देवतेच्या पालखीला निरोप देण्यात आला. डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या उत्सवात दोन्ही गावचे भाविक मोठ्या श्रद्धेने व भक्तिभावाने सहभागी झाले होते. अनेक वर्षांची परंपरा मोठ्या उत्साहाने जपण्यात आली.